Nuksan Bharpai kyc संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा रक्कम ही जमा होत आहे त्याचबरोबर इतरही नुकसान भरपाई रक्कमही आलेले आहे. पण शेतकऱ्यांचे खाते हे इ केवायसी नसल्यामुळे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत नाही. केवायसी नसल्यामुळे 71 कोटी रुपये पडून आहेत.
पीक विमा यादीत आपले
नाव पहा
राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे परंतु बीड जिल्ह्यातील एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी केली नसल्याने एका तर कोटी सात लाख रुपये वाट पहावी पडू नये या निधीचे वेळीच वाटप झाले नाही तर पुन्हा शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ही केवायसी करून घेणे आवश्यक आहे. शेतकरी कर्ज घेऊन मेहनत करून पिकांची लागवड करतात परंतु खरीप किंवा रब्बी हंगामात अतिरिक्त पाऊस सततचा पाऊस अवकाळी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असते बीड जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडून संबंधित ठिकाणचे पचना पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवून अनुदानाची मागणी केली जाते.